भगवा ध्वज आणि संत तुकाराम महाराज

तुळापुर येथील संभाजी महाराज यांच्या हातमधील भगवा ध्वज,गौतम बुध्द – सम्राट अशोक – वारकरी संप्रदाय – आणि शहाजीराजे यांचे स्वराज्याचे भारतीय निवासी यांचे प्रतिक आहे...तो हिंदू धर्माचा ध्वज नव्हे....सनातनी आर्य समाज यांचा स्वास्तिक चिन्ह असलेला काळा ध्वज आहे.

             भारत देशाला गौतम बुध्द यांनी भगवा ध्वज देऊन त्याचे चीवर म्हणून परिधान केले आहे.सम्राट अशोक यांनी संपूर्ण भारतात हा भगवा ध्वज भारतीय निवासी यांचा सन्मान म्हणून सर्वत्र पोहचविलेला आहे.त्याकाळी आर्य समाज वैदिक धर्म पंडितांचा ध्वज हा स्वस्तिक असलेला काळा ध्वज होता.त्यांचा आणि आपल्या भगव्या ध्वजाचा कोणताही संबध येत नाही.भगवान गौतम बुद्धापासून चालत आलेला भगवा ध्वज नंतरच्या काळात संत नामदेव महाराज यांनी वैदिक धर्म पंडितांच्या विरुध्द लढा उभारण्यासाठी वारकरी सांप्रदाय निर्माण करून तो भगवा ध्वज त्यांच्या हातामध्ये दिला.भारताच्या हिंदू संस्कृतीच्या परंपरागत तो भारतीय मुळ रहिवासी म्हणजे नागवंशी लोकांचे प्रतिक होते.शहाजीराजे मोगल साम्राज्यात असताना स्वराज्य संकल्पित ध्वज हा भगवा ध्वजच त्यांनी केला होता.आणि हा भगवा ध्वज शिवराय यांचे हाती स्वराज्याचे भगवे निशाण म्हणून दिला होता.संत तुकाराम महाराज यांनी हाच भगवा ध्वज हाती घेऊन स्वराज्य सेना निर्माण केली होती.नंतरच्या काळात पेशव्याने याच स्वराज्याचा भगवा ध्वजाच्या निशाणाखाली लाल महालावर शनिवार वाडा बांधून छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास बुजवून त्यांचे विचार लपवून स्वत: राजा झाला होता.मात्र सिद्ध्नाक महार या स्वराज्याच्या सरदाराने भीमा कोरेगाव याठिकाणी लाल महालावर ताबा मारलेल्या शनिवार वाड्याच्या विरोधात भगवा ध्वज हातात घेऊन पेशवाई संपवून टाकली...आणि स्वराज्याचा भगवे निशाण पुन्हा लाल महाल म्हणून प्रस्तापित करणार तेव्हा वैदिक धर्म पंडितांच्या सनातनी विचारांनी तो शनिवार वाड्यावरील भगवा ध्वज उतरून स्वत:च्या हाताने ब्रिटीशांचा कंपनी जॅक त्या लाल महालावर म्हणजे शनिवार वाड्यावर चढविला आणि स्वराज्याचा पाडाव पुन्हा एकदा या वैदिक धर्म पंडितांनी केला...आणि स्वराज्यातील शिवराय आणि संभाजीराजे यांचा इतिहास लपवून टाकला....मात्र भगवा ध्वज त्यानी कधीही हातामध्ये घेतला नाही.महात्मा ज्योतिबा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी शोधून काढली आणि त्यांचे समतावादी विचार लोकामध्ये पोहचविण्यासाठी त्यांनी शिवरायांची जयंती उत्सव सुरु केला.यावरून लक्षात येते की,वारकरी संप्रदाय आणि शिवजयंती उत्सवामध्ये भगवा ध्वज हा काही वैदिक धर्म पंडितांच्या सनातनी धर्माचे प्रतिक नव्हते.महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक धर्म स्थापन केला होता.तेव्हा स्वामी दयानंद सरस्वती यांनी हिंदू धर्म स्थापन करून या भगव्या ध्वजावर ताबा मारण्याचे कार्य केले...आणि हा हिंदू धर्माचा ध्वज वाटावा म्हणून मोदक खाणारा गणपती याचा जन्म झाला.बाळकृष्ण गंगाधर टिळक यांनी हा भगवा ध्वज हिंदू धर्माचा आहे हे भासविण्यासाठी गणेश उत्सव सुरु करून या उत्सवाचे प्रतिक म्हणून भगवा ध्वज उभा केला.त्यानंतर संभाजी ब्रिगेड नावाची संघटना अस्तित्वात आली....आणि त्यांनी हा भगवा ध्वज हिंदू धर्मियांचा नसून समतावादी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याचा आहे असा प्रचार सुरु केला.हे पाहून सनातनी हिंदू धर्मीय पुन्हा गडबडले आणि त्यांनी तुळापुर आणि वढू येथील छत्रपती संभाजी महाराज यांचे समाधी स्थळ ताब्यात घेऊन त्याठिकाणी धर्मवीर संभाजीराजे यांचा पुतळ्यावर संभाजीराजे यांच्या हातातील भगवा ध्वज हिंदू धर्माचा असून छत्रपती संभाजी महाराज हिंदू धर्माच्या संरक्षणासाठी बलीदानी झाले असा खोटा प्रचार जोरात सुरु केला आहे.

                                                                                                       राजेश खडके
                                                                                              अध्यक्ष वतन बचाओ आंदोलन

संभाजी ब्रिगेडचे ७२ मावळे इतिहासातून गायब.....सर्वत्र आनंदोत्सव साजरा....!



छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येपासून...आपण “बलिदान” नावाची बाबच विसरलेलो आहे काय...?


जेम्स लेन नावाचा एक विदेशी लेखक होता,,,,त्याने “द हिंदू किंग इस्लामिक इंडिया” नावाचे एक पुस्तक लिहिले होते.या पुस्तकामध्ये माता जिजाऊ आणि छत्रपती शिवराय यांचे बदनामीकारक लिखाण केले होते....लिखाण इतक्या खालच्या पातळीवर झाले होते की,जन्म घेतलेल्या प्रत्येक माणसाला त्याचा संताप येणारच....आजच्या बोली भाषेत म्हणायचे झाले तर आपल्याला नुसते कोणी “तुझ्या आईला” असे म्हटले तरी प्रत्येक व्यक्तीचे मस्तक हलल्या शिवाय रहात नाही....आणि माता जिजाऊ तर स्वराज्याच्या माता होत्या…..त्यांच्या बदनामीचा राग तर प्रत्येकाला येणारच.....! विषय असा आहे की,भारतीय निवासी यांचेवर या ब्राह्मणी व्यवस्थेने पूर्वीपासून हल्ला केला आहे...त्रास दिलेला आहे.सामान्य जनता कुटुंबाच्या चौकटीतून बाहेर यायला तयार नाही.त्यांना स्वत:च्या आत्मबलावर विश्वास राहिलेला नाही.त्याने आपले जीवन तेहतीस कोटी देवांच्या हातामध्ये दिलेले आहे...त्या तेहतीस कोटी देवांच्या नावावर सर्व सामान्यांना वेड्यात काडून भरकटायला लावणारी ब्राह्मणी व्यावस्थेवर विश्वास ठेऊन आपल्या जन्म दिलेल्या आई पेक्षा तो अशा भुरट्या बामनावर विश्वास ठेऊन आपल्या जीवनाचे बलिदान करीत असतो.अश्या ब्राहमणी व्यावस्थेने असुरवंशीय बळीराजापासून ते गौतम बुद्धापासून ते छत्रपती संभाजी महाराज यांचे पर्यंत हत्या घडविलेल्या आहेत....आणि हत्या केल्या आहेत.महापुरुषांची बदनामी करणे हे त्यांचे “ब्रह्म अस्त्र” आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर याच अस्त्राचा भयानक वापर करून त्यांनी त्यांचे कर्तुत्व संपविण्याचा प्रयत्न केला होता.त्यांच्यावर याच मनुवादी विचारांनी तीन वेळा विषप्रयोग केला होता. छत्रपती शिवाजी महाराजांना ज्यांनी विषप्रयोग करून हत्या केली अशा लोकांना संभाजीराजांनी हत्तीच्या पायाखाली देऊन काहींचा कडेलोट करून तर काहीना सुळावर चढवून शिक्षा दिली.मात्र याच लोकांच्या वंशजानी मनुस्मृतीनुसार संभाजी महाराजांना हाल हाल करून मारले.अशा लोकांचे अधिष्टान असणारा मोदक खाणारा गणपती आपला पूजक करून प्रत्येकाच्या घराच्या देवाऱ्यात नेऊन बसविला आहे.मग तो टिळकांचा असो किंवा भाऊ रंगारीचा असो......शेवटी संभाजी ब्रिगेडच्या सामजिक संघटनेचा पक्ष झालेल्या लोकांनी तुम्हा आम्हाला “सुखकर्ता आणि दुख:हर्ता” म्हणायला लावले आहे.ज्या गणपतीने स्वराज्य संपविले तुमच्या आमच्या पासून माता जिजाऊ – छत्रपती शिवाजी महाराज – संभाजी महाराज दूर केले.त्यांनाच आज आपण ब्रह्मा विष्णू महेश राम कृष्ण गौरी गणपती म्हणून पुजत आलेलो आहे.सत्यनारायण महापूजा करून आपले जीवनातील स्वराज्यातील अस्तित्व आपण संपवीत आहोत.असे का घडले आहे...? आणि असे का घडत आहे...? याचा विचार कोणी करीत नाही.आपण “बलिदान” नावाची बाबच का विसरलो आहे...? हे मला आज कळायला मार्ग नाही.मी जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास वाचला तो आत्मसात केला तेव्हा मला अक्षरशः रडू कोसळले.....माझे मन हेलावून गेले.त्याचे तसे कारणही आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येपासून...आपण “बलिदान” विसरलेलो आहे.शहाजीराजे यांनी पुणे प्रांतातील “नांगरवास” या गावी हत्तीच्या वजनाची तुळा करून त्याच्या वजना एवढे सोने चांदी गोरगरीब दुष्काळग्रस्त रयतेसाठी देऊन त्यांना मदत केली....आणि  तुळा केलेवरून याच “नांगरवास” गावाचे “तुळापुर” असे नामकरण झाले.आणि याच तुळापुरमध्ये शहाजीराजांनी स्वराज्य संकल्पित केले.त्यामुळे खरी स्वराज्यची पायाभरणी शहाजीराजांनी याच तुळापुर मध्ये केली होती...परंतु ब्राह्मणी व्यावस्थेने मुगल सरदार “मुरार जगदेव” या धर्म पंडिताने हत्तीच्या वजनाची तुळा केली असल्याचे जाहीर केलेले आहे.जर हा मुरार जगदेव एवढा रयतप्रिय होता.तर त्याने लाल महालावर हल्ला करून पुणे प्रांत बेचीराग कसा काय केला असा माझा प्रश्न आहे.त्यामुळे शहाजीराजे आणि स्वराज्याचा काहीही संबध येत नाही.शहाजीराजे मोघलांचेच फक्त मांडलिक कसे होते हे दाखविण्याचा प्रयत्न केलेला आहे.लाल महाल आणि दादोजी कोंडदेव यांचा कोणताही संबध नसताना पुणे महानगरपालीकेच्या वतीने बनावट उभा केलेल्या लाल महालामध्ये दादोजी कोंडदेव बनावट उभा करून माता जिजाऊची बदनामी करण्यासाठीच हा प्रकार केल्याचे इतिहासकार व संशोधक यांच्या समोर आले होते.याचाच फायदा घेऊन भांडारकर इतिहास संशोधन मंडळातील बारा धर्म वैदिक पंडितांनी अशी माहिती पुरविली की,दादोजी कोंडदेव हा छत्रपती शिवराय यांच्या कुटुंबातील अविभाज्य घटक आहे....आणि त्या लेखकाने तसे लिखाण त्याचे पुस्तक “द हिंदू किंग इस्लामिक इंडिया” यामध्ये केले आहे.आता हे पुस्तक इंग्रजीमध्ये आहे त्यामुळे सामान्य लोकांना ते लवकर समजणार नव्हते.छत्रपती संभाजी महाराज यांचेवर मनुवादी बामनानी केलेले अत्याचार आणि त्यांची औरंगाजेबाच्या माध्यमातून केलेली अमानुष हत्या त्यामुळे पुरुषोत्तम खेडेकर यांनी काही तरुण उभे करून तुळापुर येथील संभाजी महाराज यांचे समाधीला साक्ष ठेऊन “संभाजी ब्रिगेड” या नावाची संघटनेची स्थापन केली.याच संघटनेच्या ७२ कार्यकर्त्यानी भांडारकर इतिहास संशोधन मंडळावर हल्ला करून अशा बनावट इतिहासाची तोडफोड केली...त्या ७२ कार्यकर्त्यांना पोलिसांनी तोडफोड केल्याप्रकरणी अटक केली.ही बातमी वाऱ्यासारखी संपूर्ण महाराष्ट्रात पसरली गेली.सदर विषयावर खूप मोठा उहापोह झाला त्या बारा बामनावर कारवाई करून सदरच्या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी जोर धरु लागली जनता कारवाई होण्याची वाट पहात होती. “संभाजी ब्रिगेड” च्या त्या ७२ कार्यकत्यांना आता लोक मावळे म्हणू लागली....त्यांची नोंद इतिहासाच्या पानामध्ये झाली.त्यानंतर सर्व ७२ मावळे जामिनावर बाहेर आले न्यायालयाच्या पायऱ्या चढणे उतरणे सुरु झाले.संभाजीराजांच्या छाव्यांनी दादोजी कोंडदेव या बनावट वैदिक धर्म पंडितांचा पुतळा लाल महालातून बाहेर काढून टाकला.आता वैदिक धर्म पंडित मुक्त लाल महाल झाला होता....आता खरा लाल महाल शोधण्याची प्रक्रिया सुरु झाली होती.आताचा शनिवार वाडा पूर्वीचा लाल महाल होता असे पुरावे बाहेर येऊ लागले होते.शनिवार वाड्याला लाल महाल घोषित करा अशी मागणी पुढे येऊ लागली. भांडारकर इतिहास संशोधन मंडळावर झालेल्या हल्लेचा निकाल जाहीर झाला आणि संभाजी ब्रिगेडच्या ७२ मावळ्यांची निर्दोष सुटका करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले.सर्वत्र आनंदोत्सव उत्सव साजरी करण्यात आला.परंतु हा आनंदोत्सव साजरी करण्याचा विषय नाही असे मला वाटते.त्याचे कारण असे की,जर यांची निर्दोष सुटका झाली असे म्हटले तर त्या बारा वैदिक धर्म पंडितावर कारवाई झाली पाहिजे होती.त्याची इतिहासात नोंद होणे आवश्यक होते....परंतु तसे झाले नाही.त्यामुळे संभाजी ब्रिगेडच्या ७२ मावळ्यांची निर्दोष सुटका होणे हा खरा इतिहास बुजविण्याचे कार्य झाले असल्याचे माझे स्पष्ट मत आहे.याचा अर्थ स्पष्ट असा आहे की,या ७२ मावळ्यांचे कार्य वाया गेले असल्याचे माझे मत आहे.जर या मावळ्यांना जर न्यायालयाने शिक्षा सुनाविली असती...तर त्याची इतिहासात नोंद झाली असती.परंतु निर्दोष मुक्तता म्हणजे त्या संभाजी ब्रिगेडचे ७२ मावळे इतिहासातून गायब होणे असा आहे.त्यामुळे अशा प्रकारचा सर्वत्र आनंदोत्सव साजरा करणे ही आनंदाची बाब नाही.म्हणून मी म्हणतो छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येपासून...आपण “बलिदान” नावाची बाबच विसरलेलो आहे.

शनिवार वाडा होता पूर्वीचा लाल महाल - Shanivaar Wada


                                                          लाल महाल भाग - १
हाच तो लाल महाल माता जिजाऊ यांनी बाल शिवराय यांना याठिकाणी स्वराज्याचे शिक्षण दिले...आणि शिवरायांनी स्वराज्य स्थापन केले.नंतरच्या काळात छत्रपती शिवाजी महाराज यांचे अंत्यदर्शन रयतेला होऊ दिले नाही....आणि स्वराज्याचा नोकर पेशवा याने या लाल महालाच्या आजू बाजूला लाल विटांची भिंत बाधून याचे नामांतर शनिवार वाडा करून स्वराज्यावर ताबा मिळविला.त्यामुळे शिवप्रेमींची आजही इच्छा आहे की,याचे शनिवार वाडा नाव काढून पुन्हा याला लाल महाल असे नाव देण्यात यावे.

                                                       लाल महाल भाग - २
पेशव्याने मारला लाल महालावर ताबा....त्याचा केला शनिवार वाडा....!
छत्रपती शिवाजी महाराजांनी याच लाल महालावर (आजचा शनिवार वाडा) ताबा मिळवून बसलेल्या शाहिस्ते खानाची चार बोटे कापली.जीवावरचे बोटावर गेले असे समजून धूम ठोकून तो लाल महाल सोडून पळून गेला.म्हणजे महाराजांना शाहिस्ते खान हा लाल महालावर ताबा मिळवून बसलेला आवडला नाही.मग पेशव्याने लाल महालाला ताबा मारून त्याचे शनिवार वाड्यात रुपांतर केले मग स्वराज्याचा स्वराज्यप्रेमी गप्प का ...?

                                                       लाल महाल भाग - ३
शनिवार वाडा की लाल महाल......! प्रवीणदादा गायकवाड....आणि मराठा तरुण....!
मराठा तरुणांमध्ये जय जिजाऊ आणि जय शिवराय असे प्रबोधन होणार काय ....की,पेशवाई समर्थक म्हणून गप्प राहणार....!
गंमत अशी आहे की,आम्ही लाल महालाचे सत्य बाहेर आणण्याचा प्रयत्न सोशल मिडीयाच्या माध्यमातून सुरु केला.आता हा काय प्रयत्न आम्ही नवीनच करीत आहे असे नाही.मा.म.देशमुख यांचे सारख्या तर शनिवार वाडा संदर्भात तर एवढे लिखाण केले आहे की,बरेच लोकांनी त्यांच्या पावलावर पाउल टाकले आहे.संभाजी ब्रिगेडचे आणि आताचे शेतकरी कामगार पक्षाचे नेते प्रवीणदादा गायकवाड यांनी तर बरेच वेळा शनिवार वाडा पाडण्याची भाषा केली आहे...आणि असे भाषण झालेवर टाळ्यांचा गडगडाट करणारे आज शनिवार वाड्याचे नामांतर लाल महाल असे करून पुन्हा एकदा खरा इतिहास बाहेर काढून अज्ञानी युवकांना सज्ञान करावे एवढीच आमची मागणी आहे.ही मागणी समोर येताच आमच्या बरोबर असणारे मराठा नावाचे मित्र आम्हाला सोडून पळून गेले आहेत.आमच्या पोस्टला प्रतिक्रिया देण्याचे तर सोडा साधं लाईक सुध्दा करीत नाहीत.आता माझा त्यांना असा प्रश्न आहे मग तुम्ही स्वार्थी राजकारण करण्यासाठी आणि स्वत:ची पोळी भाजण्यासाठी जसे सम्राट थोरात या व्यक्तीने भाजली तशी भाजण्यासाठी येत होता का ? तुम्ही पण खासदार संभाजीराजे आणि नारायण राणे यांचे पावलावर पाउल ठेवणार आहेत काय..?

                                                        लाल महाल भाग - ४
"मराठा अस्मिता परिषद" घेण्याऐवजी शनिवार वाड्याला लाल महाल असे नाव देण्यासाठी "लाल महाल नामांतर परिषद" आयोजित करणे आवश्यक होते.
विषय असा आहे हा लढा "वैदिक विरुद्ध वारकरी" असा आहे हे आपण समजले पाहिजे.सर्वात प्रथम आपण वारकरी आहोत नंतर मराठा....!वैदिक धर्मियांनी नेहमी आपले श्रेष्ठत्व टिकविण्यासाठी या भारतीयांवर अनेक प्रकारे घातक हल्ले केलेले आहेत...आणि वैदिक धर्म हा फक्त बामणांचा धर्म आहे....आणि याचा प्रत्यय पहिल्या स्वराज्यभिषेक झाला तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज यांना लक्षात आले.कारण शुद्र म्हणून त्यांना राजा मानण्यास याच वैदिक धर्मियांनी नाकरले होते.तेव्हा छत्रपती शिवरायांना संभाजीराजे यांचे ऐकुन २४ सप्टेंबर मध्ये शाक्त पद्धतीत दुसरा राज्यभिषेक करवून घेतला आणि वैदिक बामानांचे श्रेष्ठत्व नाकारून टाकले आहे.याची किमत छत्रपती शिवरायांना प्राण देऊन चुकवावी लागली आहे हे आपण आज विसरलो आहे.छत्रपती संभाजीराजे यांची हत्या करून त्यांना धर्मवीर पदवी देण्यात आली हे पण आपण विसरलो आहे.सनातनी धर्माच्या माध्यमातून लाल महालाचे अस्तित्व संपवून शिवशाही संपवून पेशवाई स्थापित केली गेली आहे.लाखोंच्या संखेने मराठा अस्मिता म्हणून आम्ही ५८ वेळा एकत्र आलेलो आहे.मात्र लाल महालाचे अस्तित्व ज्या शनिवार वाड्याने संपविले त्याच्या विरोधासाठी लाखोंच्या संखेने आम्ही एकत्र एकदाही आलेलो नाही.जो पर्यंत लाल महालची अस्मिता आपण पुन्हा एकदा निर्माण करीत नाही...तो पर्यंत मराठा अस्मिता उभी राहू शकत नाही.त्यामुळे मराठा अस्मिता परिषदेच्या माध्यमातून आपली अस्मिता जागरूक होऊ शकत नाही.जो पर्यंत शनिवार वाड्याचे अस्तित्व आहे तो पर्यंत खोले बाई सारखे लोक मजबूत राहणार आहे.त्यामुळे आपल्या परगण्यात आपणच परकीय झालो आहोत हे आपण लक्षात घेतले पाहिजे.म्हणून आयोजकांना माझी विनंती आहे की,"मराठा अस्मिता परिषद" घेण्या ऐवजी "लाल महाल नामांतर परिषद" घेण्यात यावी.

                                                    लाल महाल भाग - ५
जातीसाठी ५८ वेळा लाखोंच्या संख्येने एकत्र आलात....आता लाल महालाच्या अस्मितेसाठी एकदा तरी लाखोच्या संख्येने एकत्र या.....!
मराठा जातीसाठी मराठा क्रांती मुख मोर्चाच्या माध्यमातून लाखोंची संख्या एकत्र आणण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात आयोजकांनी दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करून गावोगावी बैठका घेऊन तरुण तरुणींच्या मनामध्ये एक जोश निर्माण करून "एक मराठा लाख मराठा" अशी घोषणा घेऊन संपूर्ण महाराष्ट्र दणाणून सोडले होते....असाच एकदा हा लाखोचा तरुण लाल महालाच्या अस्मितेसाठी एकत्र का येत नाही असा प्रश्न आता सर्वांना निर्माण होत आहे.मराठा अस्मिता ही स्वराज्याच्या इतिहासावर उभी राहिलेली आहे...आणि ती जर पुन्हा जागरूक करायची असेल तर लाल महालापासूनचा इतिहास जागरूक करावा लागेल.शिवरायांनी ज्या लाल महालात स्वराज्याचे धडे घेतले तो लाल महालाचा खरा इतिहास स्वाभिमानाने जगा समोर आणला पाहिजे.महानगरपालिकेने उभी केलेली प्रतिकृतीला लाल महाल दाखवून नवीन पिढीची फसवणूक करू नये त्याचे कारण असे की,त्या प्रतिकृतीच्या बाजूला असलेला शनिवार वाडा पाहून पेशवाईचे राज्य एवढे आवाढव्य कसे असा प्रश्न निर्माण होऊन तो पेशवाईची गुलामगिरी सोडायला तयार होईना.....त्यामुळे खरी मराठा अस्मिता जागरूक करायची असेल तर शनिवार वाड्याचे लाल महाल असे नामांतर झालेच पाहिजे.

                                                              लाल महाल भाग - ६

युगपुरुष खेडेकर साहेबानी सांगितल्याप्रमाणे मराठ्यांच्या अस्मितेसाठी बुधवार दि.२७/९/२०१७ रोजी "लाल महाल नामांतर परिषद" होणार काय ....?
प्रश्न असा आहे की,"शनि"म्हणजे वक्रदृष्टी आणि "वार " म्हणजे दिवस तसेच "वाडा" म्हणजे निवास असे शनिवार वाड्याचे विश्लेषण आहे....आणि हिंदू धर्मात या शनीपासून आपली स्वत:ची सुरक्षा करायची असेल तर.....त्या शनीला शरण जाऊन त्याची भक्ती करायची असा समज आहे.मग विषय असा आहे की,शहाजी राजे-माता जिजाऊ-छत्रपती शिवराय यांचे असणारे निवासस्थान "लाल महाल" याला "शनिवार वाडा" असे नाव कोण आणि कसे देण्यात आले.....या "शनि" नावाला मान्यता कोणी दिली.याचा विचार या पश्चिम महाराष्ट्रातील मराठा का करीत नाही.मग इथला मराठा कोणती "अस्मिता" या मराठा अस्मिता परिषदेच्या माध्यमातून मांडणार आहे असा आमचा साधा प्रश्न आहे.गेल्या ५ भागातून आम्ही मराठ्यांची खरी "अस्मिता" काय आहे याची मांडणी करीत आलेलो आहे.
आम्ही विनम्र असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक यांना केले आहे....जो पर्यंत या लाल महालावर बामन नावाचा शनी बसला आहे तो पर्यंत मराठा अस्मितेला स्थान निर्माण होऊ शकत नाही.त्यामुळे शनिवार वाडा अशा नावाला इतिहासात कोणतीही मान्यता देण्यात आलेली नाही.म्हणून आमचे या पश्चिम महाराष्ट्रातील मराठ्यांना विनम्र आवाहन आहे की,शनिवार वाड्याचे लाल महाल असे नामांतर होणे आवश्यक आहे.त्यासाठी मराठा अस्मिता परिषद बाजूला ठेऊन छत्रपती शिवरायांच्या शिवशाहीसाठी "लाल महाल"नामांतर परिषद घेण्यात यावी....आणि जो पर्यंत अशी परिषद होत नाही तो पर्यंत मराठ्यांना अठरा पगड जातीमध्ये आणि बारा बलुतेदारामध्ये मानाचे स्थान निर्माण होणार नाही.पुरुषोत्तम खेडेकर साहेब मराठ वाड्यातील आहेत आणि आणि कुणबी समजाचे आहेत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे अत्यंत जवळचे आहेत.छत्रपती शिवराय हे पण मराठवाड्यातील आहेत.पश्चिम महाराष्ट्रातील नाहीत.त्यामुळे खेडेकर साहेबानी खरा इतिहास बाहेर काढून पेशवाईतील शनी पूजक मराठ्यांना शिवलिंग मंदिर पूजक आणि स्त्री शक्ती पूजक असे घडविले आहे.परंतु मराठा क्रांती मुख मोर्चाच्या माध्यमातून पुन्हा एकदा या मराठयांना शनी पूजक घडविण्याचा प्रयत्न पेशवाईतील गुलाम मराठ्यांनी सुरु केला आहे.त्यामुळे मराठ्यांची अस्मिता धोक्यात आलेली आहे.....आणि ती जर खरच जागृत करायची असेल तर "लाल महाल नामांतर परिषद" घेण्यात यावी.


                                                              लाल महाल भाग - ६
शिवलिंग मंदिर - स्त्री शक्ती उपासना - जैन धर्म - बौध्द धर्म - वैदिक धर्म - महाभारत- रामायण -आणि....छत्रपती संभाजी राजे....!
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली राज्य घटना
छत्रपती संभाजी राजे सत्य...आणि महाभारत काल्पनिक कथा...!
आपल्या देशाला "भारत" हे नाव पूर्वीपासूनचे असलेले नाव आहे....आणि सिंधु नदीच्या माध्यमातून या देशातील राहणारे लोकांना इंदू आणि इंदुज म्हणत असे...हा देश सिंधु संस्कृतीतील असल्यामुळे नंतरच्या काळात हिंदू संस्कृती पध्द्तीचे जीवन जगणारे लोक असे म्हणत होते.ते शिवलिंग मंदिराचे आणि स्त्री शक्तीचे उपासक होते.म्हणून बहुजन समाजाच्या जीवनात स्त्री शक्तीच्या पूजेला खूप महत्व आहे.वेगवेगळ्या पद्धतीत तो स्त्री शक्तीचे पूजन करीत असतो.या देशाचा पहिला धर्म जैन आणि बौध्द धर्म आहे.युरेशिया नावाच्या देशातून ज्या लोकांचे आगमन झाले असे म्हणतात....ते त्यांचे आगमन नसून ते आक्रमण आहे हे पहिले आपण लक्षात घेतले पाहिजे.अशा आक्रमण केलेल्या लोकांना आर्य म्हणत असे या आर्य लोकांचा धर्म हा वैदिक धर्म आहे.स्वत;ला सोडून इतरांना ते या धर्मात कधीच सामावून घेत नाही.या आर्य प्रमुखाचे नाव "मनु" असे होते.या भारत देशातील बहुजन समाजावर आपली पकड निर्माण करण्यासाठी इथली संस्कृती ताब्यात घेण्यासाठी या मनूने स्वत:चा कायदा तयार केला.त्याला मनुस्मृती असे संबोधण्यात आले.यातून सर्वात प्रथम त्यांनी स्त्री शक्तीला बांधण्याचे कार्य केले...आणि तिला बदनाम करण्यासाठी "महाभारत" नावाचा ग्रथ तयार करून त्यामध्ये एका स्त्री ला पाच पुरुषांची पत्नी करून द्रोपदी नावाचे पात्र तयार करून तिचे वस्त्रहरण दाखवून श्रीकृष्णाच्या माध्यमातून त्याने केलेल्या रासलीलेच्या माध्यमातून आंघोळ करणाऱ्या स्त्रियांची छेडछाड दाखवून स्त्रीचे अपहरण दाखविण्यात येऊन स्त्री शक्तीची अवहेलना केली आहे.असा धर्म ग्रथ या भारत देशाचा असू शकत नाही.दिन दुबळ्या बहुजन समाजाचे संरक्षक याला क्षत्रिय दाखवून त्यांच्यात श्रेष्ठत्व निर्माण करून त्यांच्या हातामध्ये दरवर्षी लाल धागा बांधून स्वत:च्या संरक्षणाची हमी घेत त्यांनी संपूर्ण बहुजन समाजाला गुलाम केले होते....आणि याच मनुस्मृतीच्या कायद्याचा वापर करून औरंगाजेबाच्या माध्यमातून छत्रपती संभाजी राजे यांना देहदंडाची शिक्षा याच वैदिक धीर्मिय बामनानी दिलेली आहे.असा विसर आज आपल्याला पडलेला आहे.....अशा वैदिक धर्माला भारताच्या राज्यघटनेत कवडीची किमंत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली नाही.


                                                           लाल महाल भाग - ७

शनिने लाल महालावर केलेले आक्रमण धुडकावून लावण्यासाठी शनिवार वाड्याचे नामांतर लाल महालात करण्याचा ठराव संमत करणार असल्याचे मराठा अस्मिता परिषदेचे आयोजक यांचे आश्वासन....!
राजेश नारायण खडके
स्वराज्यप्रेमी
आम्ही आमच्या सुरु असलेल्या स्वराज्याचे हिरे या कार्यक्रमाच्या माध्यमातून जेव्हापासून मराठा अस्मिता परिषद ऐवजी "लाल महाल नामांतर परिषद" घेण्याचे सोशल मिडीयाच्या माध्यमातून आवाहन आम्ही केलेले आहे.तेव्हापासून बरेच बहुजनांचे मला वैयक्तीक फोन आलेले आहेत.आम्ही करीत असलेल्या कार्यक्षेत्रात येऊन आमची भेट घेऊन सदरच्या कार्यक्रमा संदर्भात आमची भेट ते घेत आहे.त्यांचे असे म्हणणे की,काही राजकीय नेत्यांचा आणि मराठा क्रांती मुख मोर्चातील हिंदुवादी मराठा यांचा आमच्यावर दबाव निर्माण झालेला आहे.त्यामुळेच आम्ही खोले बाईच्या विरोधातील काढलेला मोर्चा आम्हाला स्थगित करावा लागला....आणि त्यासाठी खोले बाईच्या मनुवादी विचारांच्या विरोधात "मराठा अस्मिता परिषद" आयोजित करावी लागली आहे....आपण सदरची मराठा परिषद ऐवजी लाल महाल नामांतर परिषद घेण्याचे जे भावनिक आवाहन केले आहे.त्याबाबत आम्ही खेडेकर साहेब यांचे बरोबर चर्चा केली आहे.त्यांनी विषय चांगला आहे घेण्यास काही हरकत नाही.परंतु आता मराठा अस्मिता परिषद कार्यक्रमाची प्रसिद्धी भरपूर झालेली असून त्यात बदल करता येत नाही.परंतु सदरच्या कार्यक्रमात फोकस हा मराठा अस्मिता आणि लाल महाल अशीच राहणार आहे.तेव्हा आम्ही खेडेकर साहेब यांचे बरोबर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.त्यामुळे उद्या मराठा अस्मिता परिषदेच्या माध्यमातून लाल महाल परिषद होणार अशी आशा बाळगण्यास काही हरकत नाही.त्यामुळे सर्व बहुजन बांधवांना विनम्रतेची विनंती आहे की,शनिवार वाड्याचे नाव बदलून लाल महाल असे नामांतर करण्याचा ठराव संमत होणार असून सर्व बहुजन समाजाने सदरच्या कार्यक्रमात आपली उपस्थिती दाखवावी.

                                                         लोकांच्या प्रतिक्रिया

१) चंद्रकांतजी डोक्य़ातील असल नसल तेव्हढी घाण बाहेर काढून टाका. कोणाशी काय बोलताय याचं तळतंत्र नाही तुम्हाला. शिवाजी महाराजांच्या मारामरीचा फोटो टाकला म्हणजे शिवभक्त ठरत नाही. या शेवटच्या उत्तरात पक्के ठरले की तुम्ह शिनभक्त नसून युरेशियन आर्य ब्राम्हण आहात. याचे कारण तुम्ही स्वराज्याचे गद्दार वंशातील आहात. हे सिध्द होते.
तुम्हाला शिवाजी महाराज कळणार नही. समजले तर बिलकुल नाही.
आमचे घराणेच स्वराज्य व शिवरायांच्या घराणयाला जोडलेले आहे. त्यामुळे स्वराज्याचा इतीहास आम्हाला शिकवायची गरज नाही. तुम्हाला आमच्याकडूनच शिकण्याची गरज आहे.


२) स्वराज्यातील गद्दार मराठ्यांच्या सहकार्याने महाराजांनी रयतेसाठी कमवलेली स्वराज्य नावाची कमाईवर ब्राम्हणानी डल्ला मारला आहे. शिवरायांच्या ख-या पाईकांचे सोडा वंशजाना पण ही टिळाधारी जमात जुमाणत नाही.
खडके साहेब टिळाधारी गद्दार मराठ्याना काय मिळाले ?


३)मिसाळ साहेब तुमचे एकदम बरोबर आहे.
पण खडहे साहेबांना असे वाटत असावे की ज्यांना जेव्हढी माहीती असेल त्यानी ती स्वताकडे न ठेवता ती सोशल मिडीयावर व्हायरल करावी. जेने करून नविन संशोधकाना व नविन पिढीला त्याचा उपयोग होईल.
तुमचेच उदाहरण घ्या तुम्ही गणोजी शिर्कें बाबत किती छान व अभ्यास पुर्ण विश्लेशन केले होते.असे एक एक वैचारीक पुढे आले तर फायदाच होईल !
 

४) खडके साहेबपोस्ट हिट किंवा फ्लॉप ही लाईक वर अवलंबून नसते
उलट ज्या पोस्टला लाईक कमी किंवा प्रतिक्रिया कमी ती पोस्ट हिट समजायला हरकत नसते

प्रवीणदादावर अंतर्गत कुरघोडी मुळे अन्यायच झाला आहे त्यांची कधी इच्छा नव्हती ब्रिगेड सोडायची ते भाजपच्या पण गळाला लागू शकले असते पण त्यांनी शेकाप निवडला


५) मराठा अस्मिता जागी होईल का ?
पुण्याची पाटीलकी झाबंरे पाटलांची किती पुणेरी मराठा झांबरे पाटलाना मान सन्मान देतो ? लाल महाल बांधण्यसाठी झांबरे पाटलांचे काय आणी किती योगदान आहे हे मराठा अस्मितावाल्याना काय माहीत ?
जे लोक लाल महालाला विसरून गेले त्यांनाझांबरे पाटील कधी समजणार ?

अस्मितावाले चव्हाणांचे नाव पण घेणार नाहीत.


६) खडके साहेब,
लाल महालामध्ये शाहीस्ते खानाने तळ ठोकला होता. त्या वेळेस महाराजांची राजधानी राजगडावर होती. महाराज आणी माता जिजाऊ लाल महालात नव्हत्या नोकर चाकर लाल महालाला संभाळत होते. पुणे परगण्यातील सर्वात मोठी वास्तू सात ताळाच्या माडीवर एैशोआराम करत बसल
े नाहीत. महाराज स्वराज्याने झपाटलेले होते. कुटूंबाच्या सुरक्षेसाठी महाराजानी लालमहालाला राजधानी बनवले नव्हते. म्हणून राजे राजगडावरच सुरक्षित होते. २५ वर्षे राजगडावरून स्वराज्याचा राज कारभार पाहीला. स्वकिय मराठा, ब्राम्हण आणी मोगल हे महाराजांचे व स्वराजेयाचे दुष्मन होते. सर्वात जास्त धोका स्वकीय मराठ्यांकडून होता. महाराजाना व माता जिजाऊना स्वराज्यामुळे लाल महालामचे सुख घेता आले नाही. आणी त्या सुखाची दोघा मायलेकरानी कधी आशा बाळगली नाही.
शाहीस्ते खानाने लालमहालाचा कब्जा घेतला. लाल महालाचा कब्जा घेतल्यावर शिवबा लाल महाल सोडवण्यासाठी निश्चित येइल याची शाहीस्ते खानाला खात्री होती. महराज मोठे सैन्य घेऊन येतील असे शाहीस्ते खानाला वाटले होते. पण महाराजाना स्वकीय मराठाची साथ नव्हती. त्याचे महत्वाचे कारणे असे की महाराज एकतर पश्च्छिम महाराष्ट्रातील नव्हते. नव्हते. महाराज मराठवाड्यातील होते. महाराजानी दलीत शोषित पिडीत लोकांच्या सहकार्याने राज्य उभे केले होते. शहाजी महाराजाना मोगलांकडून मिळालेल्या जहागीरीच्या भांडवलावर महाराजानी स्वराज्याची संकल्पना मांडली होती. महाराजानी जहागीरीची तमा न बाळगता स्वराज्य उभे केले होते. संपुर्ण जहागीरी स्वराज्यासाठी बहाल केली होती.
स्वराज्यातील पहीली वास्तू म्हणजे लाल महाल याच लालमहालावर शाहीस्ते खानाने कब्जा केल्यावर महाराजानी निवडक व विस्वासू सैन्य घेऊन लाल महालावर गनिमी काव्याने हल्ला चढवला आणी लालमहालाला पुन्हा ताब्यात घेतला. लालमहालातील घुसखोर शाहीस्तेखान हाकलून देण्यासाठी. राजगड व प्रचंडगडाच्या परीसरातील विस्वासू सैन्य घेऊन लाल महालतील कब्जेखोर शाहीस्तेखान हाकलण्यास यशस्वी ठरले.
लाल महाल संभाळण्यासाठी विस्वासू व मजबुत एकही मराठा पुढे येत नव्हता. लाल महालासाठी स्नराज्य सोडून देता येत नव्हते. काहीतरी पर्याय काढणे आवश्यक होते.
पुणे परगाण्यातील खंड (महसूल) गोळा करणयासाठी कोणाची तरी नियुक्ती करणे आवश्यक होते. म्हणून महाराजानी बाळाजी विश्वनाथ नातू या ब्राम्हणाची कारकुन ( पेशवा) म्हणून नियुक्ती केली.पुणे परगण्यातील खंड(महसूल) गोळा करण्याची व लेखा जोखा ठेवण्याची जबाबदारी दिली. मिळालेल्या खंडातून( महसूल) लालमहाल व परगणयाची सुरक्षा करयची पुणे परगणयाचा खंड स्वराज्यासाठी वापरायचा नाही .असे ठरउन दिल्यामुळे या खंडावर (महसूलावर) पेशवा माजला.
डयरेक्ट बामनाच्या हतात महाल गेल्यासारखे झाले.महाराज व संभाजी महाराजांच्या हत्तेनंतर लाल महालावर बामनाचा कब्जा झाला. पेशवाई व लाल महाल सुरक्षित रहावी म्हणून लाल महालाला तट रक्षक भिंत बांधण्यात आली. आणी याच भिंतीला शनिवारवाडा नाव पडले. पेशव्यानी लाल महालाचे शनिवारवाडा असे नामकरण कधीच केले नाही. स्वराज्याच्या वास्तूला शनीग्रहण लागले. अशा कुस्चित भावनेने रयतेकडून पडलेले नाव आहे. नाहीतर दगडाच्या कोरीव शिलावर शनिवारवाडा नाव कोरले असते.
स्वराज्याच्या वास्तूला व स्वराज्याला लागलेला शनी आहे. शनी हा वाईट भावनेचे नाव आहे. कोण आपल्या स्वताच्यां वास्तूला "शनी" " यम" नाव देइल का ?

शेतकर्‍यांच्या मुलांच्या रखडलेल्या लग्नांचा प्रश्न गंभीर



सर्वेक्षण अहवाल निष्कर्ष 

सर्वेक्षणात ४५ गावात ३०६८ लग्न न झालेली तरुण मुले 

शेतकर्‍यांच्या मुलांच्या रखडलेल्या लग्नांचा प्रश्न गंभीर 

       शेतकरी आंदोलन,शेतकरी कर्जमाफी यावर चर्चा सुरू असताना शेतीची दुरावस्था झाल्याने शेतकरी कुटुंबात किती गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत याचे एक भयावह वास्तव एका सर्वेक्षणात पुढे आले आहे.       हेरंब कुलकर्णी व विठ्ठलराव शेवाळे यांनी अहमदनगर जिल्ह्यातील अकोले व संगमनेर तालुक्यात ४५ गावात लग्न रखडलेल्या शेतकर्‍यांच्या मुलांचे सर्वेक्षण केले तेव्हा ४५ गावात लग्न रखडलेली ३०६८ तरुण मुले आढळली.त्यात ७७४ तरुण मुलांची वये ३० ते ४० च्या दरम्यान आहेत. शेतीमालाला भाव नसल्याने व शेतीव्यवसाय उध्वस्त होण्याचा परिणाम शेतकर्‍याची कुटुंबसंस्थाच उध्वस्त होण्याच्या दिशेने जात असल्याचे वास्तव या सर्वेक्षणाने पुढे आले आहे. विशेष म्हणजे यात सर्व जातीचे शेतकरी आहेत. या सर्वेक्षणाला पूरक म्हणून शेवगाव(पुणे) पुणे व सोलापूर जिल्ह्यातील १० गावांची पाहणी केली असता तिथेही तेच चित्र दिसले.याचा अर्थ संपूर्ण महाराष्ट्रात कमी अधिक संखेने हेच वास्तव असल्याचे पुढे आले आहे.
            शेतकरी आंदोलन मागील महिन्यात सुरू झाल्यावर शेतकरी कार्यकर्ते रोहिदास धुमाळ यांनी हेरंब कुलकर्णी यांना हा प्रश्न लक्षात आणून देवून काही गावात नेवून हा प्रश्न दाखविला. सुरवातीला यावर विश्वास बसला नाही तेव्हा अकोले व संगमनेर तालुक्यात . हेरंब कुलकर्णी व विठ्ठलराव शेवाळे  यांनी ४५ गावात सर्वेक्षण केले . तेव्हा २५ ते ३० वयोगटातील २२९४ तरुण मुले व ३१ ते ४० वयोगटातील ७७४ तरुण मुले आढळली. यातील बहुसंख्य मुले अल्पभूधारक असून शिक्षणही चांगले आहे. अनेकजण पदवीधरक आहेत. ४ मुले एम.बी.ए. झालेली असून बेकार असल्याने व शेती करीत असल्याने लग्न रखडले आहे. ३० वयोगट उलटलेल्यांनी तर आता लग्नाची आशा सोडून दिली आहे. दोन मोठ्या गावात तर  ३०० व २५० मुले सापडली तर १०० पेक्षा जास्त मुले आढळलेलीही १२ गावे आहेत. ५० पेक्षा जास्त मुले असलेली ८ गावे आहेत. केवळ अल्पभूधारक च नव्हे तर अगदी १० एकर जमीन असलेल्या कुटुंबात ही लग्न होत नसल्याचे दिसून आले.  एका कुटुंबात तर ६० गुंठे जमीन असल्याने ३ मुलांची लग्न रखडल्याचे भीषण वास्तव दिसल्याचे हेरंब कुलकर्णी व विठ्ठल शेवाळे यांनी सांगितले. 
           गावकर्‍यांशी बोलल्यावर हे वास्तव गेल्या ४ वर्षात अधिक गडद झाल्याचे त्यांनी सांगितले.सर्व जातीतील मुले यात असल्याने आता शेतकरी हीच एक जात असल्याचे लक्षात आले.लग्न रखडण्याची अनेक कारणे या सर्वेक्षणातून पुढे आली. त्यात २०१२ च्या दुष्काळ व त्यानंतर सतत भाव पडण्याची प्रक्रिया,वाढलेला उत्पादन खर्च यातून शेतीवर जगणे अधिक कठीण झाले.परिणामी शेतकरी बाप आपल्या मुलीला अजिबात शेतकरी कुटुंबात द्यायचे नाही या निष्कर्षावर आले आहेत. मुलीही माहेरी बघितलेले शेतीचे हे भयावह वास्तव व त्यात करावे लागणारे जनावारासारखे कष्ट यामुळे लग्न करून शेतकरी कुटुंबात जायला उत्सुक नाहीत. पूर्वी मुली वडिलांच्या पुढे निर्णयात जात नसत पण एकूणच मुलींची संख्या कमी झाल्याने मुलींना मागणी वाढली.त्यात ८ वीपर्यंत नापासी नाही व बोर्डाच्या सोप्या परीक्षा गेल्या १० वर्षात गावोगावी झालेले ज्युनिअर कॉलेज, बालविवाह थांबविण्याची झालेली चळवळ व जागृती यामुळे मुली सहज आज १२ वी पर्यन्त शिकू लागल्या. त्यातून अधिक चांगल्या जीवनाची तयार झालेली आकांक्षा,शहरी महिलांशी होणारी तुलना, यातून व्यक्तिमत्व विकासाची व चांगल्या जीवनशैलीची आस तयार झाली त्यामुळे शिकलेल्या मुली नोकरदार व शहर याला प्राधान्य देवू लागल्या व त्यातून हे वास्तव तयार झाले.
         एक शेतकरी म्हणाला की आज खेड्यात १० एकर असण्यापेक्षा तालुक्याला १० बाय १० चे दुकान असले तर लवकर लग्न होते. त्यातून अनेक गावात लग्नाच्या मुलांना सहकारी संस्थात लग्न होईपर्यंत नोकरीला ठेवा अशी गळ घालणारे कार्यकर्ते आहेत तर अनेक तरुण सिन्नर,चाकण येथील कारखान्यात लग्न जमेपर्यंत नोकरी मिळवायची धडपड करीत आहेत. एका कुटुंबात नोकरी करणार्‍या धाकट्या मुलाचे लग्न झाले व मोठ्या मुलाचे लग्न राहिले अशी विषण्ण स्थिति बघण्यात आली. यावर्षी झालेल्या लग्नात शेतकरी मुलांची किती लग्न झाली ? असा नेमका प्रश्न विचारला तेव्हा ती संख्या जवळपास नाही अशीच आढळली. एका गावात एकूण २७ लग्न यावर्षी झाली त्यात फक्त २ लग्न झाली व तीही नात्यातील होती. पिंपळगाव देपा येथील ज्ञानेश्वर उंडे यांनी सांगितले की मी दरवर्षी १०० लग्ने कित्येक वर्षे जमवली आहेत पण गेल्या ३ वर्षात एकही लग्न मी जमवू शकलो नाही. या तीन वर्षात एकाही मुलीचा बाप माझ्याकडे आला नाही पण मुलाचे बाप मात्र विचारात आहेत.
महाराष्ट्रात इतरत्र चित्र कसे आहे ?हे बघण्यासाठी काही मित्रांना विनंती केली तेव्हा सोलापूरजिल्ह्यातील सतीश करंडे (४ गावे )पुणे जिल्ह्यातील विठ्ठल पांडे(४गावे) व शेवगावचे उमेश घेवरीकर (२ गावे) यांनी पाहणी केली.तेव्हा या १० गावात ३१९ मुलांची लग्न रखडल्याचे आढळले. महाराष्ट्राच्या जिल्हया जिल्ह्यात पाहणी केल्यास हेच वास्तव असल्याचे  आढळले. 
       या शेतकरी अगतिकतेतून अनेक विधायक व विघातक गोष्टी घडत आहेत. विधायक बाबीत मुलीच्या बापाचे लग्नातील शोषण कमी होत आहे.हुंडा प्रथा कमी होते आहे .अनेक ठिकाणी मुलाकडच्यांनी लग्न करून मुली लग्न करून आणल्या आहेत.विधवा व परित्यक्ता,अनाथ आश्रमातील मुली यांच्याशी लग्न करण्याचे प्रमाण वाढते आहे. नाशिक,यवतमाळ ,ठाणे या भागातील आदिवासी भागातील मुलींशी आंतरजातीय विवाह करण्याचेही अल्प पण लक्षणीय उदाहरणे आढळली हे सकारात्मक पैलू आहेत तर अडलेल्या शेतकर्‍यांचा गैरफायदा घेणारे एजंटही निर्माण झाले आहेत. अगदी मुली दाखविण्याचे ५००० रुपये घेणे,इतर जिल्ह्यातील मुलीशी लग्न लावून देणे असे उद्योग ते करतात.यातून अनेकांची फसवणूक ही झाली आहे.शेतकर्‍याच्या वेदनेचा असा बाजार मांडला जातो आहे.
       जिरायती गावात तर हा प्रश्न खूप गंभीर होतो आहे.त्यातून गावाबाहेर व शेतीबाहेर पडण्याची मानसिकता तयार होते आहे. सारोळा पठार या दुष्काळी गावातील ३०० कुटुंबातील ४१२ मुले गावाबाहेर नोकरी किंवा व्यवसायाला गेले असल्याचे प्रा.दिलीप पोखरकर यांनी लक्षात आणून दिले. वाढते नागरीकरण हे उध्वस्त होणार्‍या शेती धंद्यातून तयार झाल्याचे हे वास्तव अधोरेखित करते.बागायती गावात हा प्रश्न नसेल असा समज होता पण अनेक बागायती व प्रतिष्ठित असलेल्या गावातही हा प्रश्न गंभीर असल्याचे लक्षात आले. 
      यावर दीर्घकालीन उपाययोजना म्हणजे शेतीमालाला भाव देवून शेती करण्यातली प्रतिष्ठा उंचावणे हाच आहे. नोकरीत व्यवसायात जसे शाश्वत उत्पन्न मिळते तसे शेतीत जेव्हा मिळेल व शेतीतील अमानुष कष्ट यांत्रिक वापराने कमी होतील तेव्हाच शिकलेल्या मुली आनंदाने शेतकरी जोडीदार निवडतील. पण तात्कालिक उपाय म्हणून शेतकरी कार्यकर्ते, गावातील प्रतिष्ठित यांनी अशा गावनिहाय याद्या करून जिल्ह्यात व जिल्हयाबाहेर अनेक गावांशी संपर्क करून अशा गरजू कुटुंबांचा शोध घ्यावा असे अनेकांनी सुचविले. प्रगतीशील उपसरपंच बाळासाहेब मालुंजकर यांनी परभणी जिल्ह्यातील एक गाव व त्यांचे गाव अशी गाव ते गाव सोयरीक करण्याचा प्रयत्न केला होता. असेही प्रयत्न व्हायला हवेत . निराश होत असलेल्या या मुलांचे समुपदेशन करणे ही आवश्यक आहे. या कुटुंबाशी संवादी राहण्याची गरज आहे.या मुलांचे पालक सतत चिंतेत असल्याचे आढळले.नैराश्यातून अल्प संख्येने काही मुले व्यसनाकडे ही वळत आहेत.  
         ही समस्या अशीच दुर्लक्षित राहिली तर १० वर्षानी खेड्यात वेगळेच गंभीर प्रश्न निर्माण होतील. या मुलांची  नैराश्यातून शेतीतील कार्यक्षमता ही कमी होईल.  
          शेतीच्या प्रश्नांची चर्चा करताना इथून पुढे या गंभीर पैलूची चर्चा करायला हवी. ज्येष्ठ शेतकरी नेते व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष दशरथ सावंत म्हणाले की “ या नव्या आर्थिक चातुर्वर्ण्य व्यवस्थेत  शेतकरी आता नवशूद्र ठरतो आहे हेच विदारक वास्तव हे सर्वेक्षण पुढे आणते आहे.सुखासिन इंडिया निर्माण होताना अमानुष कष्ट असलेल्या या भारतात शेतकरी अधिक केविलवाणा झाला आहे . “
        या सर्वेक्षणासाठी रोहिदास धुमाळ, शांताराम गजे, निलेश तळेकर, दिलीप पोखरकर,विनोद हांडे यांचे विशेष सहकार्य लाभले.   
१०० पेक्षा जास्त रखडलेली लग्न  असलेली गावे =    
५० ते १०० रखडलेली लग्न असलेली गावे =   
         १२
         
                                           
     एकूण गावे
२५ ते ३० वयोगटातील रखडलेली लग्ने
३१ ते ४० वयोगटातील रखडलेली लग्ने
     ४५
      २२९४
       ७७४

                                       सर्वेक्षण केलेले
          हेरंब कुलकर्णी (९२७०९४७९७१) विठ्ठलराव शेवाळे (९३७२०१२२२१)













  
 

 

© Copyright PPPMS . All Rights Reserved.

Designed by Avim and sponsored by PPPMS India