कोल्हापूर जिल्हा

महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक जिल्ह्यांत विविध स्वरूपाची पर्यटन स्थळे आहेत. या पर्यटन स्थळांची जिल्हावार माहिती महाभ्रमंती या सदरामधून आपल्याला मिळत असते. आज या सदरात दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरची माहिती घेणार आहोत. येथील महालक्ष्मी मंदिर प्रसिद्ध असून देशभरातून भक्त तिच्या दर्शनाला येतात. कोल्हापूर ही मराठ्यांची राजधानी म्हणूनही ओळखली जाते. शिक्षण व उद्योगाचे हे एक महत्त्वाचे केंद्र आहे.

पन्हाळा
इतिहासकालीन लढ्यांमध्ये पन्हाळा किल्ल्याने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. उंचीवर असल्यामुळे हे गिरीस्थान म्हणूनही प्रसिद्ध आहे. कोल्हापूरच्या सभोवताली पन्हाळा, विशाळगड, महिपळगड आणि कलंदिगड ह्या गडांच्या जोड्या आहेत. येथे तुम्ही तीन मोठ्या ईमारती पाहू शकता त्याला ‘अंबरखाना’ म्हणतात. पन्हाळा हे ठिकाण कोल्हापूर पासुन 20 कि.मी. अंतरावर आहे.समुद्रसपाटी पासुन 977.2 मी. ऊंचीवर असलेले, पन्हाळा हे मोहक प्रेक्षनिय स्थळ आहे जेथे आपण आपली सुट्टी घालवण्यासाठी जाऊ शकतो. पन्हाळा किल्ल्यामुळे व ईतर डोंगरामुळे करड्या किंवा पांढर्‍या रंगाचा वारसा येथे जपला आहे.हा किल्ला राजा भोज यांनी 1178-1209 मध्ये बांधला आहे आणि डेक्कन किल्ल्यांमध्ये सर्वात मोठा किल्ला आहे.

महालक्ष्मी
महालक्ष्मीची आख्यायिका सर्व पुराणात आढळते. मोठ्या किमंतीच्या दगडापासून, 40 कि.ग्रॅ. वजनाची देवीची मुर्ती बनवली आहे.ह्याच्यामध्ये हिरक नावाचा धातु मिसळला आहे. ज्याच्यापासून मुर्तीवर प्राचीन काळापासून प्रकाश फेकला जातो.ह्याची रचना बाहेरच्या बाजुला असलेल्या ‘शिव-लिंग’ सारखी आहे.हे मंदीर चौकोनी दगडांच्या तुकड्यावर ऊभारले आहे ज्याच्यामध्ये हिरक आणि वाळु मिसळली आहे.वाघाची मुर्ती बाहेरच्या बाजुला ऊभा आहे.

बाहुबली

जैन धर्मियांच्या दोन विविध पंथांची येथे मंदिरे आहेत. त्यामुळे साहजिकच त्यांच्यासाठी हे एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे.


राधानगरी
घनदाट जंगलाने वेढलेला हा परिसर अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आला आहे. येथील भगवती नदीवर वीज निर्मितीचे महत्त्वाचे केंद्र आहे.

विशाळगड
छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक सुटकेमुळे विशाळगड इतिहासात प्रसिद्ध पावला आहे. आजूबाजूच्या निसर्गरम्य परिसरामुळे चित्रपट निर्मात्यांमध्ये हा परिसर लोकप्रिय आहे. जवळपास ऊत्तरेला पन्हाळ्यापासुन 60 कि.मी. आणि कोल्हापूर पासुन 18 कि.मी. दक्षिणेला हा किल्ला आहे. घनदात जंगलातुन हा रस्ता जातो. खोल दरीमुळे मार्गापासुन हा किल्ला वेगळा केलेला आहे. हा दिसायला खूप मोठा आहे म्हणुन ह्याला ‘विशाल’ असे नाव देण्यात आले. दरीमुळे ह्या गडा आत जाण्याचा मार्ग देखील कठीण आहे.

दाजीपूर अभयारण्य
कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यातील हे रम्य गाव. दाजीपूर एक छोटसं गाव मात्र या दाजीपुरात रम्य, घनदाट झाडी, वृक्ष, शेकडो नमुन्याचे प्राणी आणि पक्षी आढळतात, या अरण्यात निसर्गाच्या कुशीत गेल्याचा अनुभव मिळतो हे या गावाचे वैशिष्ट्य आहे. या अरण्यात गवा, हरिण, सांबर, चितळ यांचे कळप दिसतात. तसेच लाल मातीत बिबळया वाघाच्या पायाचे ठसे दिसून येतात. हे अभयारण्य कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवर, राधानगरी तालुक्यामध्ये वसले आहे.हे एक आकर्षित सहलीचे ठिकाण आहे ज्याच्यामध्ये प्राणी, पक्षी आणि निसर्गाचे सौंदर्य आहे. ‘गवा’ रेड्यासाठी हे जंगल प्रसिद्ध आहे. येथे मोठ्या प्रमाणात सांबर, हरण, अस्वल आणि साप आढळतात. जंगल रिसॉर्ट हे एक सुंदर ठिकाण राधानगरी धरणाच्या मागील बाजूस आहे.

न्यु पॅलेस
भवानी मंडप – कसबा बावडा मार्गावर ही एक प्राचीन ईमारत आहे. 1877 – 1884 ह्या कालावधीत ही ईमारत बांधली गेली. काळ्या, सपाट केलेल्या दगडांचा एक ऊत्कृष्ट नमुना बांधला आहे जे सर्व प्रवाशांच मन वेधुन घेते. ह्याला लागुनच एक बाग आहे, त्याला दगडांच्या भींतीचे व तारांचे कुंपन आहे.संपुर्ण ईमारत आठ कोनी आहे आणि त्याच्या मध्ये बुरूज आहे.1877 मध्ये येथे घड्याळ बसवले. थोड्या – थोड्या अंतरावर येथे बुरूज आहेत.प्रत्त्येक काचेवर शिवाजी महाराजांच्या जीवनाविषयी लिहीले आहे. येथे प्राणी संग्रहालय व मैदानाची जमीन आहे. आजचे, श्रीमंत शाहु महाराजांचे निवास्थान आहे.
भुदरगड
कोल्हापूरच्या दक्षिणेस भुदरगड हा प्रसिद्ध ऐतिहासिक किल्ला सह्याद्रीच्या मध्यावर उभा आहे. या किल्ल्यावर श्री केदारलिंग, भैरवनाथ, जखूबाई अशी देवस्थाने आहेत.


संकलन - विलास सागवेकर,
उपसंपादक

0 comments:

Post a Comment

 

© Copyright PPPMS . All Rights Reserved.

Designed by Avim and sponsored by PPPMS India